Thursday 22 May 2014

Top 10 Marathi Movie Characters of All Time

किव्वा
मराठी चित्रपटातल्या माझ्या सर्वात आवडत्या १० व्यक्तिरेखा

इथे लेखक आणि दिग्दर्शकांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखेबद्दल आपण बोलत असलो तरी, ती व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार हि तितकाच महत्त्वाचा हे विसरून चालणार नाही !!

 

१०) प्राची (चित्रपट: इन्व्हेस्टमेंट, २०१३)

  रत्नाकर मतकरी लिखित आणि दिग्दर्शित "इन्व्हेस्टमेंट" या चित्रपटातली प्राची हि 'आई' या शब्दाच्या आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या परिभाषा बदलते. सुप्रिया विनोद नी साकारलेली हि भूमिका आजच्या धावत्या जगाचं प्रतिनिधित्व करते. आपल्या मुलाला राजकारणी बनवायचं असं ठरवून त्याच्यावर तसेच संस्कार ती करते. मग त्याने आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून केला असला, तरी त्याच्या मागे खंबीरपणे(वेगळ्या अर्थाने) उभी राहते. एकीकडे अशी आई कधीच चित्रपटात दिसली नव्हती आणि तिचा प्रत्येक गुण आपल्याला आश्चर्याचा धक्का देत असला तरी तिचं वागणं बोलणं हे ओळखीचं वाटतं !
        आपल्या मुलांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक पापावर पांघरून घालून आपण खरंतर "इन्व्हेस्टमेंट" करतो हे सिद्ध करणारी थोर आई आपल्या मनावर कायमचा आघात करून जाते.  

 

 

९) नच्या दादा (चित्रपट: विहीर, २०१०)

  गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांचा विहीर हा चित्रपट सगळ्याच अंगाने विलक्षण आहे. पण या चित्रपटाचा जीव नच्या दादा या व्यक्तिरेखेत आहे. आलोक राजवाडे या अत्यंत गुणी अभिनेत्याने साकारलेला नचिकेत चित्रपट बघितल्यावर मनातून जातच नाही. चित्रपटाचा नायक खरंतर त्याचा मावस भाऊ 'सम्या' ज्याचा त्याच्या नच्या दादावर खूप जीव आहे. नच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो, त्याच्या घरातल्यांचा, मित्रांचा एकंदरीत आयुष्याचा. संसारात गुंतणं नच्याला कठीण वाटतं. दूर पळून जावसं वाटतं. त्या वयात(१४-१६) विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला अशे अनुभव येतात. ते अनुभव आपण नच्याच्या रुपात जगतो.
         प्रेक्षक म्हणून आपण नच्याच्या मरणाने तितकेच अस्वस्थ होतो जितका सम्या होतो. कारण अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेव्हा सापडत नाहीत पण चित्रपट संपल्यावर सापडतात !

 

 

८) फाळके (चित्रपट: हरिश्चंद्राची फॅक्टरी, २००९)

  "राजा हरिश्चंद्र" या पहिल्या भारतीय चित्रपटामागची धडपड दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी गमतीशीर रित्या या चित्रपटातून दाखावली. दादासाहेब फाळके यांचं व्यक्तिमत्व मोकाशी यांनी काही वास्तविक तर काही त्यांच्या नुसार रेखाटलं. खरे फाळके कसे होते हे कुणालाच ठामपणे सांगता येणार नाही पण त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचं जे चित्र आपल्यासमोर येतं ते मोकाशींनी रेखाटलेल्या चित्रासारखच. नंदू माधव यांनी या भूमिकेत अगदी सहजपणे केलेला वावर या व्यक्तिरेखेला चार चांद लावतो.
        प्रोफेसर 'केळ्फा' यांचे कारनामे अनेकदा बघून सुद्धा पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात !! 

 

 

७) अवली (चित्रपट: संत तुकाराम, १९३६)

  निष्कारण देवदासच्या नावाचा दिवा जपणाऱ्या पारोपेक्षा तुकोबांना येडं म्हणणाऱ्या अवलेचं प्रेम मला जास्त खरं वाटतं ! गौरी या अभिनेत्रीने साकारलेली जिजाई किव्वा अवली म्हणजे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातली सर्वात वेगळी आणि खमकी बायको..! तुकोबांवर फडाफडा डाफरणारी पण तरीसुद्धा तुकोबांवर जिवापार प्रेम करणारी हि त्यांची बायको विष्णुपंत पागनीस यांच्या तुकोबांच्या व्यक्तिरेखेपेक्षा मला जास्त प्रभावी वाटते.

 

 

६) श्यामची आई (चित्रपट: श्यामची आई, १९५३)

  सानेगुरुजींच्या "श्यामची आई" या पुस्तकावर प्र. के. अत्रे यांनी बनवलेला हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाची खरी ओळख. आईची माया आणि तिचे संस्कार इतक्या सुंदर रित्या कधीच चित्रपटात दिसले नसावे. वनमाला पवार यांनी साकारलेली आई हे आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे. कुठल्याही माणसाला घडवण्यात त्याच्या आईचाच सर्वात मोठा हाथ असतो, हि बाब हा चित्रपट बघितल्यावर अगदी तंतोतंत पटते.

 

 

 ५) मास्तर (चित्रपट: पिंजरा, १९७२)

  व्ही. शांताराम यांचा "पिंजरा" हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीत दोन गोष्टींमुळे मैलाचा दगड ठरला, एक त्यातल्या लावण्या आणि दोन म्हणजे श्रीराम लागू यांचा अभिनय. गावाच्या विकासाठी आयुष्य देणारा मास्तर पुढे एका नाचणाऱ्या बाईच्या प्रेमात पडतो आणि मग कसा खडतर प्रवास त्याला करावा लागतो हे आपण ह्या चित्रपटात बघतो. मास्तर ह्या व्यक्तिरेखेचा हा विलक्षण प्रवास लागूंनी अतिशय सहजपणे दाखवला.

 

 

४) तुकाराम (चित्रपट: तुकाराम, २०१२)

 १९३६ मध्ये आलेल्या संत तुकारामा या चित्रपटातल्या संत तुकाराम पेक्षा चंद्रकांत कुलकर्णींच्या "तुकाराम" या चित्रपटातला जितेंद्र जोशी ने साकारलेला तुकोबा मला जास्त आवडतो. कारण हा तुक्या जादूचे खेळ न करता लोकांना जगण्याची खरी दिशा दाखवतो. हा देवाला मित्र मानतो आणि वेळ पडली तर त्याच्याशी भांडतो देखील. खरे तुकोबा आपल्याला ह्या चित्रपटातूनच भेटले. विठ्ठलाचा लळा त्यांना बालपणीच होता, पण घराच्या सगळ्या जवाबदार्या सांभाळत पुढे ते विठ्ठलाची भक्ती करू लागले. चित्रपटात दाखवलेला दुष्काळ आपल्याला तुकोबांची खरी कहाणी सांगतो. तो दुष्काळ तुकोबांना आणि आपल्याला अंतिम सत्य काय ह्याची प्रचीती हि आणतो.

 

 

३) वासुदेव बळवंत ठोंबरे (चित्रपट: रात्र आरंभ, १९९९)

 "स्क्रीझोफेनिया" या मानसिक आजाराच्या रुग्णाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात साकारली. प्रभाकर फडके हे रिटायर्ड झालेले, साठी ओलांडलेले ज्यांना लेखनाची आवड. ते एक कादंबरी लिहतात ज्याच्यात स्वतःला श्रीमंत आंधळे उद्योगपती "वासुदेव बळवंत ठोंबरे" ह्या पात्रात पाहतात. काही काळानंतर ते स्वतःच ठोंबरे म्हणून वावरू लागतात. आपली नालायक मुलं इस्टेटीसाठी आपल्याला मारत्यात असं त्यांना वाटू लागतं आणि तेव्हा सावतःच्या खऱ्या मुलाला ते मारून टाकतात. २००२च्या ऑस्कर शर्यतीत जिंकलेला एक इंग्रजी चित्रपट होता ज्याच्यात "रस्सल क्रो" ह्याने हि एका  स्क्रीझोफेनिक रुग्णाची भूमिका केलेली, पण माझ्या मते प्रभावळकरांचं काम हे क्रो पेक्षा हि उत्कृष्ट झालेलं !!

 

 

२) मास्तर (चित्रपट: सामना, १९७५)

  विजय तेंडूलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित सामना हा चित्रपट म्हणजे मराठी आणि भारतीय चित्रपटाला सर्वात मोठा मैलाचा दगड. श्रीराम लागू यांचा मास्तर हा म्हटलं तर गांधीवादी, म्हटलं तर दारुवादी. त्यंच्या भूतकाळात असं काही तरी घडून गेलं असावं कि ज्याने वाटतं कि एकेकाळी हा माणूस समाज बदलू पाहणारा होता, पण आता हा फक्त रस्तोरस्ती फिरणारा एक दारुड्या. हिंदुराव साहेब त्याला आसरा देतात, पण त्याच्या उलट हा नको नको ते प्रश्न विचारतो आणि साहेबांना हैराण करतो. जगाच्या पाठीवर फक्त एकच नट हि भूमिका करू शकतो आणि ते म्हणजे खुद्द लागूच असं पक्का विश्वास हा चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकालाच आहे.

  

 

१) हिंदुराव धोंडे पाटील (चित्रपट: सामना, १९७५)

 मास्तर ज्या साहेबांना हैराण करतात ते हेच, हिंदुराव धोंडे पाटील. मराठी चित्रपटातला सर्वात लखलखता तारा म्हणजे निळूभाऊ, आणि त्यांच्या आयुष्यातली सर्वात विलक्षण व्यक्तिरेखा हीच. एक पुढारी ज्याने त्याच्या विभागाचा विकास केला, ज्या गावात माणूस आणि कुत्रं एकाच भाकरीसाठी भांडत होते, तिथल्या लोकांना स्वतःची भाकर दिली. पण असा विकास करण्यासाठी एखाद्या मारुती कांबळेला कायमचा उपटून काढावा लागतो. हिंदुरावांना सत्ता हवी असते, पण लोकांचं मन हि जिंकायचं असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात असा एक हिंदुराव असतोच अजूनही आहे. निळू फुले यांनी अनेक इरसाल खलनायक चित्रपटात साकारले, पण हिंदुराव फक्त खलनायक नव्हता आणि फिल्मी तर अजिबात नव्हता. तेंडूलकर आणि पटेल यांच्या मते मास्तर हि व्यक्तिरेखा जास्त वर्चड होती, पण निळूभाऊंनी त्यांच्या भूमिकेत इतका जीव ओतला कि आपण आज मास्तर कि हिंदुराव या पेचात पडलो. माझ्यासाठी तरी हिंदुराव मास्तरांपेक्षा एक पैसा सरस...!!

 

 

तर मराठी चित्रपटातले ह्या माझ्या सर्वात आवडत्या १० व्यक्तिरेखा...!!!

Friday 17 January 2014

10 Greatest Marathi Movies of All Time


or My Favorite Marathi Movies of All Time

10) Shala(2012) 

Recently we saw the hugely anticipated Ravi Jadhav Directed "Timepass". Anyone who has watched "Shala" can easily identify the similarities. But on one hand Shala was made to express...& Timepass was made to impress!! & i was very disappointed by Timepass but Shala impressed be so much that i couldn't resist the temptation to have it in my all time list. 

The Movie was an adaptation of a novel by Milind Bokil of the same name. a couple of years before this movie was made, a one act play named "Ga Ma Bha Na" by Ruia College became hugely popular..which too was an adaptation of the same novel. 

However the way Sujay Dahake presented this beautiful movie...we could hardly compare the play with this movie. Every frame of this movie takes you to that classic nostalgic era...when things were less complicated. Sujay Dahake is one director who has that correct balance of a cinematic vision & an ability to present the true flavor of our culture through cinema. 

 

9) Chaukat Raja(1991) 

Starring Arguably The Greatest Actor Alive in India and Unarguably The Most Versatile Actor Alive in India....Dilip Prabhavalkar as a mentally challenged person or a disabled boy. This movie was one of the first movies...which made me fall for marathi cinema while growing up. 

All those Cinematic Nazis(sometimes even i am one of them) might not be convinced enough with this inclusion...but i felt this movie deserves a special perspective. Because witnessing Dilip Prabhavalkar, Ashok Saraf & Sulbha Deshpande essaying such beautifully written characters is an experience to cherish.

 

 

 

8) Harishchandrachi Factory(2009)

 How can I not have this beautiful piece of art in my list...a movie that depicted the emergence of the biggest film industry in the world. Dadasaheb Phalke made the first Indian movie in 1913..but Paresh Mokashi, the Director of this movie actually took us back in time & made us experience the joyful struggle of doing something different in the society.

It's one of those movies which brings a smile on your face everytime you watch it...& it's hard to evaluate what exactly made you feel good. I have to mention the impeccable background score which contributed to that feel good factor & also helped in recreating the British Raj era.

 

 

 

7) Jogwa(2009)

Made on the Life of a group of People called a Jogta or a Jogtin(who are forced by the society to give up everything and serve God. A jogta has to give up the fact of being a man and suppress all his desires. A jogtin is expected to give up herself, she cannot get married, have children or have a life of her own) & Directed by Rajeev Patil was undoubtedly the Boldest movie made in India.

It highlighted those pathetic superstitions & religious believes which are still practised in our country & also portrayed the terrifying journey of those two characters. 

Upendra Limaye(who bagged the national award for his performance) & Mukta Barve were certainly outstanding...But everytime you see Kishor Kadam(who also played a Jogta) in the frame...you cannot notice anyone else...!!!

 

6) Ratra Aarambh(1999)

Dilip Prabhavalkar played a schizophrenic in this Very first Marathi Movie(I guess the 1st indian movie too) made on schizophrenia in the same year when "A Beautiful Mind" bagged four oscars. 

Even though the screenplay of this movie was more like a novel...it manages to keep us guessing throughout. After Watching Dilip Prabhavalkar's performance in this movie even Al Pacino, Tom Hanks, Jack Nicholson & Robert De Niro would have dropped their jaws...!!

Again i would categorize it as a performance oriented movie...still the overall impact is as good as any cinematic wonder!!!

 

 

 

5) Investment(2013)

Written & Directed by Great Marathi Writer Ratnakar Matkari....Investment is an hard hitting experience which hits straight on the face of this so called competent...& materialistic society.

For someone who was brought up with middle-class values...it could have a soothing effect too...as we feel fortunate about our upbringing but that won't stop us from feeling guilty as to some extent we too are a part of this society.

The performances of the cast makes it even more impactfull..especially Supriya Vinod as the mother..who will shock you with every word she utters & yet you will feel that you are familiar with her!! Last year a few movies managed to achieve astonishing success on the box-office..but Investment didn't quite do well. Nevertheless to me it was the best movie of 2013 & one of the best in my all time list.

 

4) Kunku(1937)

Directed by the legendary V. Shantaram..Kunku..based on the novel "Na Patnari Goshta" by Narayan Hari Pethe...who also wrote it's screenplay was a daring piece of art made in the pre independence era. 

The condition of women in India in that era was rightly depicted in this movie..however It didn't stop at just depiction of the unjust...it went on to find a solution to it with a climax that could be described as extra-ordinary even after 75+ years after this movie's release. 

It was also released in hindi as "Duniya Na Mane" & proved how powerful cinema can be...throughout the nation.

 

 

3) Tukaram(2012)

Written By Prashant-Ajit Dalvi & Directed by Chandrakant Kulkarni...Tukaram a biopic of the Great Poet-Social Reformer-Saint of India Sant Tukaram. In 1936 another biopic of Sant Tukaram was made by Prabhat Film Company..which is considered as an all time classic & became hugely popular in various festivals around the world back then. 

As a movie the 1936 biopic was certainly entertaining...but it was nothing more than a devotional melo-drama were the focus was on the over hyped magic tricks of Tukaram Maharaj which he never really performed. But Kulkarni showed the real Tukaram Ambivle & here he wasn't a magician or a godly figure but a poet, a social reformer, someone who has the courage to stand against the inequality in society. And the strongest point of this movie was that it actually showed the emergence of the warkari sect in Maharashtra...which showed that devotion need not be about expecting something & everybody is equal & has equal rights to lead his life the desired way. It showed how Tukya became Tukaram Maharaj & throughout the journey we are nothing but overwhelmed by this man & his antics. To me it is the greatest biopic ever made in India.

 

2) Vihir(2010)

Directed by an Institution in himself "Umesh Vinayak Kulkarni".... "Vihir" could easily be declared as the another word for "cinema" according to me(in India). As the tagline goes...get drenched in the well...Vihir was that exact experience for me..I was in my mid teens..when i watched it for the 1st time & felt I am watching myself somewhat occupied in that similar mental frame.....which is difficult to put in words. 

Samir & Nachiket(the two adolescent boys...about whom this movie is) seems to be us & their journey towards realization of this puzzle called life seems to be our journey...while watching it. Apart from that every element of this movie has a underlying meaning to it & they seem so real that they appear to be happening with us & they do in reality...But in our lives we are so much involved in our rat race that we never really thought of it...! I am a huge fan of Umesh's other works(Deool & Valu) too & I feel Umesh Vinayak Kulkarni is a gift to the marathi film industry & we the audience have to realize that because his movies deserve more than just the "Festival Audience".

 

1) Samna(1975)   

Written by Vijay Tendulkar, Directed by Jabbar Patel & starring Nilu Phule & Shreeram Lagoo in The Greatest Battle of Marathi Cinema(& to much extent Indian cinema) "Samna". Jabbar Patel went to Vijay Tendulkar with an concept of a battle between Phule & Lagoo with a political backdrop....Then Vijay Tendulkar started writing keeping them in mind...& what happened next is history & Marathi Cinema got it's Greatest Movie.

Nilu Phule(unarguably The Greatest Actor of marathi industry) playing a wealthy politician who rules his region single handedly is met by a homeless drunk educated philosopher in his province played by Shreeram Lagoo(arguably The Greatest Actor of marathi industry). the politician finds almost everything for him...in return he refuses to reveal his indentity, steals from him, asks questions which he is not prohibited to & finally makes the wealthy, powerful emperor vulnerable. Even Though Both Phule & Lagoo gave performances worth an oscar or something even bigger than that...it was Nilu Phule as Hindurao Dhonde-Patil who leaves slightly heavier impact on us while Shreeram Lagoo as the Master is probably the next best in a all time list! Jabbar Patel made many more honest & beautiful movies(Sinhasan, Umbartha, Mukta & a few more) after these but even if Samna was his only movie...we would still be talking about him today & for years to come!!! 

 

 

so here's my pick....But I hope in coming years it will be changed...!! As Many Passionate filmmakers like Nagraj Manjule, Sujay Dahake & others are constantly working towards the betterment of Marathi Cinema...whereas Ppl like Sanjay Jadhav & Ravi Jadhav are giving that Commercial Solidity which is also important for the survival of Marathi Movies!















Monday 30 December 2013

२०१३ चा मागोवा

२०१३ हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी content wise आणि commercially दोन्ही बाजूने महत्त्वाचे ठरले. वर्षाची सुरुवात "बालक पालक" सारख्या चित्रपटाने  आपलं नाणं तिकीट घरात खणखणीत वाजवून केली आणि पुढे "दुनियादारी" ने तो वारसा चालवला.

पण वर्षभरात जर ७०-७५ चित्रपट प्रदर्शित होत असतील तर त्यातले अवघे १०-१२ चित्रपट commercially जगतात तर मोजून ३-४ चित्रपट नफा कमावतात. हे खरंतर खूप गंभीर आहे आणि "हि Industry नक्की चालते तरी कशी ?" हा प्रश्न उत्पन्न करणारी हि बाब आहे. पण गेल्या काही वर्षांपासून हे चित्र  सतत बदलतंय..social media आणि television media मुळे प्रेक्षक हळूहळू सिनेमागृहात येतोय हे हि तितकंच खरं. असो..पण मी चित्रपटांना फक्त आणि फक्त content च्याच आधारावर rate करतो.

तर सुरुवात गोडापासून करूया...खालील १० चित्रपट हे मला ह्या वर्षातले सर्वात आवडलेले मराठी चित्रपट: 

Top 10 Marathi Movies of 2013

१) इन्व्हेस्टमेंट
रत्नाकर मतकरी लिखित, दिग्दर्शित "इन्व्हेस्टमेंट" हा चित्रपट मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात POWERFUL चित्रपट. हा चित्रपट वास्तविक तर आहेच, पण हा पाहताना आपलं प्रेक्षक म्हणून होणारा भावनिक प्रवास शब्दात न मांडता येणारा आहे. आजच्या materialistic society च्या सणसणीत मुस्काटीत मारणारा हा चित्रपट आहे.

२) आजचा दिवस माझा
प्रशांत-अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "आजचा दिवस माझा" हा चित्रपट ह्या वर्षातला मी पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट. ह्याच चित्रपटातल्या एका संवादाप्रमाणे कुणीच न जाणाऱ्या दुर्लक्षित मंदिरात दिवा लावण्याइतकाच निर्मळ हा चित्रपट आहे. राजकारणी देखील माणूस असू शकतात हा जगावेगळा ROMANTIC विषय कुलकर्ण्यांनी सुंदर रित्या हाताळाय.

३) बालक पालक 
रवी जाधव दिग्दर्शित "बालक पालक " एका एकांकीकेवर आधारित हा चित्रपट लोकांनी अक्षरशः उचलून घेतला आणि महाराष्ट्र भर याने कल्ला केला. एका अत्यंत BOLD विषयावर हा चित्रपट असला तरी ह्याची treatment हि trademark रवी जाधव style ची होती. रवी जाधव येत्या काही वर्षात दिग्दर्शक म्हणून एका वेगळ्याच उंचीवर असतील ह्यात काहीच शंका नाही. अडगळीत टाकलेले housefull चे boards single screen सिनेमागृहांच्या मालकांना शोधायला ह्या चित्रपटाने भाग पाडलं. 

४) नारबाची वाडी
गुरु ठाकूर लिखित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "नारबाची वाडी" हा चित्रपट मूळ बंगाली कथेवर आधारित असला तरी, माझ्या मते कोकणातल्या अस्सल लाल मातीतल्या माणसांची मजा पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

५) ७२ मैल
राजीव पाटील आज आपल्यात नसले तरी जाताजाता "७२ मैल" हा आमच्या स्मरणात कायमचा राहील असा चित्रपट ते बनवून गेले. वास्तविकतेला cinematic दृष्टीकोन मिळाला कि प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडतोच हे राजीव पाटील यांनी अनेक वेळा सिद्ध केलंय जे ते ह्या चित्रपटातून हि करतात.

६) संहिता
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्या जोडीचा "संहिता" हा चित्रपट एखाद्या कवितेसारखा सादर केलेला आहे. ह्या जोडीने अनेक वर्षांपासून जी मनापासून चित्रपट बनवण्याची परंपरा चालवलीय, ती ह्या चित्रपटाने आणखी पुढे न्हेलीय.

७) अनुमती
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "अनुमती" हा चित्रपट पाहताना तुमच्या मनात ACIDITY झालीच पाहिजे. म्हातारपण माणसाचं दुसरं बालपण असतं असं म्हणतात, पण ते फक्त परीकथेत असावं असं हा चित्रपट बघितल्यावर वाटतं.

८) चिंटू २
श्रीरंग गोडबोले यांचा "चिंटू २" हा चित्रपट म्हणजे खराखुरा बालचित्रपट. फारसी तामझाम नसून, महागडे vfx नसूनही एक चांगला adventurous चित्रपट बनवला जाऊ शकतो हे गोडबोल्यांनी सिद्ध केलंय.

९) प्रेमाची गोष्ट
वर्षाच्या सुरुवातीला आलेला हा सतीश राजवाडे यांचा "प्रेमाची गोष्ट" हा चित्रपट म्हणजे साधी, सरळ, सोप्पी पण सुंदर अशी प्रेम कहाणी. ह्या गोष्टीत ती दोघं प्रेमात कशी पडतात हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो अनेक lovestorys मधून सोयीस्कर रित्या वगळला जातो.

१०) पुणे ५२
उमेश विनायक कुलकर्णी यांची निर्मिती असलेला आणि नवोदित पण कर्तबगार दिग्दर्शक निखील महाजन यांचा "पुणे ५२" हा चित्रपट एका विशिष्ट वैचारिक ठेवण असलेल्यांसाठीच आहे असं काही नाही. महाजनांच्या दिग्दर्शनात हलकी हलकी "Master of Suspense" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर दिग्दर्शक Alfred Hitchcock यांची छाप आढळून येते.

 

ह्या १० मध्ये नसलेले पण प्रेक्षकांना आणि मलाही आवडलेले ह्या वर्षातले हे मी निवडलेले ८ चित्रपट:

Notable Omissions

१) टाईम प्लीज
लग्नानंतर जोडप्यांच्या आयुष्यात येणारे बदल आणि त्यातून होणारे गैरसमज अश्या theme वर आधारित हा चित्रपट होता. एका नाटकाचा हा remake असला तरी ह्यात सिनेमा होता असं म्हणायला हरकत नाही.

२) दुनियादारी
ह्या चित्रपटाबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही कारण जर तुम्ही मराठी प्रेक्षक आहात आणि हा चित्रपट आवडला नाही असं होणारच नाही.

३) तेंडूलकर आऊट
खरंतर क्रिकेटचा या कथेशी फारसा संबंध नव्हता पण पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी केलेला हा क्रिकेटमय प्रयोग वेगळा आणि मनोरंजन करणारा होता.

४) पोपट
खूप महत्त्वाचा असा एक social message ह्या चित्रपटात होता पण त्याचा वापर promotion साठी न करता लोकांना तो थेट सिनेमागृहात सिनेमाच्याच माध्यमातून cinematically दिला गेला.

५) खो खो
केदार शिंदेचा नवा खेळ म्हणून ह्याचं promotion केलं गेलं होतं. आता केदार शिंदेच्या चित्रपटातले लोकांना आवडणारे आणि समीक्षकांना न आवडणारे सगळे elements ह्यात होते. 

६) पितृऋण
एका कन्नड कादंबरीवर आधारित हा चित्रपट आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीवर चिकटून ठेवतो. दिग्दर्शन जरी सामान्य दर्ज्याचं असलं तरी कथेच्या जोरावर हा चित्रपट आपण आपल्याबरोबर घेऊन जातो.

७) तुह्या धर्म कोंचा
धर्म ह्या विषयावर चित्रपट बनवणं म्हणजे आपल्या देशात खूप मोठं धाडसच आहे. चित्रपट अगदी प्रमाणिकपाने बनवलेला होता पण थोड्याफार प्रमाणात तो फसला असला तरी चित्रपटातलं वेगळेपण कौतुकास्पद आहे.

८) रामचंद्र पुरषोत्तम जोशी
अनेक वर्ष रखडलेला हा चित्रपट ह्या वर्षी अखेर प्रेक्षांच्या भेटीला आला. fantasy ह्या genre खूप कमी चित्रपट आपल्याकडे होतात त्यामुळे हे दिग्दर्शकाने केलेलं धाडसच होतं.

 

शेवट गोड नसावा असं माझं तत्व असल्यामुळे ह्या वर्षी जे काही माझा भ्रमनिरास करणारे चित्रपट होते त्यातले हे निवडक चित्रपट.
म्हणजे "नाव मोठं लक्षण खोटं" type चे:

Notable Disasters

१) जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा
"झेंडा" आणि  "मोरया" नंतर अवधूत गुप्तेचा हा चित्रपट म्हणजे त्याची आधीची पुण्याई विसरवणारा होता. निलेश मोहरीरचं संगीत वगळता काहीच लक्ष्यात राहत नाही हा चित्रपट बघून झाल्यावर.

२) मंगलाष्टक वन्स मोअर
टाईम प्लीज ह्या काही महिन्यांआधीच आलेल्या चित्रपटाशी असलेलं साम्य तर खटकतच पण दोन अत्यंत गुणी कलाकार waste केल्या सारखे वाटतात. इथेही निलेश मोहरीरचं संगीतच तारणहार ठरतं. आता संपूर्ण स्वप्नील-मुक्ता fanclub साठी हा चित्रपट चांगलाच होता, पण वर्षभरात(आयुष्यभरात) इतके चांगले चित्रपट बघणाऱ्यांना हा चित्रपट पसंती पडणं कठीणच.

३) टूरींग टॉकीज
काही दिवसांपूर्वीच बातमी ऐकली कि हा चित्रपट यंदा oscar च्या शर्यतीत आहे. oscar च्या शर्यतीत कुठलाही भारतीय चित्रपट असला तर मला आनंदच आहे पण ह्या वर्षी अनेक deserving options होते कि मग हाच का? देव बेनेगल दिग्दर्शित "Road Movie" ह्या काही वर्षांपूर्वी आलेल्या हिंदी चित्रपटाशी असलेलं साम्य किती easily ignore केलं गेलं. असो पण त्यापेक्षा मोठी खटकणारी बाब म्हणजे ह्या चित्रपटाने महाराष्ट्रातल्या तंबू चित्रपट संस्कृतीचा चा सरळ सरळ अपमान केलाय. निर्माती तृप्ती भोईर आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या मते महारष्ट्राच्या गावोगावी भरणाऱ्या तंबूत फक्त पांचट आणि अश्लील चित्रपट लोकांना आवडतात जे अजिबात खरं नाही. खरंतर कमी budget मध्ये बनणारे cinematically अर्थशून्य असे कौटुंबिक चित्रपट हे तंबू सिनेमांची जान आहेत जे आधी एका documentry मधेही दाखवलं होतं.

४) कोकणस्थ
महेश मांजरेकर यांनी गेल्यावर्षी "काकस्पर्ष" हा चित्रपट बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण त्यानंतर आधी "कुटुंब" आणि आता "कोकणस्थ" असे एका पाठोपाठ एक दोन वायफळ चित्रपट बनवले. त्यांच्याच 'विरुद्ध" ह्या हिंदी चित्रपटाचा उगाचच केलेला हा remake कुणाच्याच पचनी पडला नाही.

५) झपाटलेला २
मराठीतला पहिला 3D चित्रपट म्हणून याचं promotion केलं गेलं होतं. पण महागडे VFX, सुंदर कंबर हलवणारी नटी, चिकना नट आणि भूतकाळातली पुण्याई चित्रपट चांगला असण्यासाठी पुरेशी नसते हे परत एकदा सिद्ध झालंय.


 ६) वी आर ऑन होऊन जाऊ द्या
तेंडूलकर देखील कधी कधी शून्यावर बाद होतो ना! मग अमोल पालेकर सुद्धा एखादा अर्थशून्य चित्रपट बनवू शकतात कि! ते सुद्धा इतक्या मोठ्या, जाणत्या आणि गुणी कलाकारांना सोबत घेऊन. सिनेमा ह्या माध्यमातली uncertainty ह्या गोष्टीतून कळून येते.!!

तर २०१३ ला आता निरोप देणार आहोत आपण सारे पण २०१४ मध्ये येणारे मराठी चित्रपट आतापासूनच आपल्याला उत्सुक करत्यात. रवी जाधव दिग्दर्शित "टाईम पास" २०१४ च्या पहिल्याच आठवड्यात येतोय तर पुढे सुजय दहाके दिग्दर्शित "आजोबा", नागराज मंजुळे दिग्दर्शित "फॅंड्री", अभिजित पाणसे दिग्दर्शित "रेगे"आणि शिवाजी पाटील दिग्दर्शित "धग" ह्या सगळ्यांबद्दल भयंकर उत्सुकता आहेच!!!

 

 


Tuesday 2 July 2013

दुःखाचा व्यापारी

ऐका ऐका इथे लक्ष द्या

दादा, काका, मावशी, आत्या सगळे या

विकण्यास आणले मी नवे, कोरे, ताजे 'दुःख'

आधी सहन करा मग मोबदला द्या 

जर जालीम नाही निघाले तर

एकाच्या किमतीत दोन घ्या

किंमत मात्र ‘सुख’ तुमचे

एक सुख द्या अनेक दुःख घ्या

मानसिक घ्या, शाररीक घ्या

खास सवलतीत ‘वेदना’ घ्या

मनःशांतीच्या मोबदल्यात

अपराधीपणा घ्या

तुमच्या एक एक हसऱ्या क्षणांवर

त्यांच्या दुप्पट अश्रू घ्या

एकदा घ्याल कायमचे खपाल

हाथ पाय गळून टाहो फोडत बसाल

आशेच्या एखाद्या किरणेच्या बदल्यात

हरवलेला आत्मविश्वास घ्या

माणसांच्या प्रेमाच्या बदल्यात

त्यांचा द्वेष घ्या

देण्यास तुमच्याकडे सुख नसले तरी चालेल

तुमच्या त्या शिळ्या दुःखाच्या बदल्यात

आमचे नवे, कोरे, ताजे ‘दुःख’ घ्या....


- अभय आनंद साळवी



  

Monday 10 June 2013

पाऊस आल्यावर...


पाऊस आल्यावर सगळ्यांना कविता होतात
त्याला तिच्या आणि तिला त्याच्या कळा येतात

ह्यांच्या भावनांचे बांधच फुटतात
२ BHK च्या भिंती तोडून अनावर धावतात

कधी पाखरू कधी काजवे होतात
तर कधी पहाटेचा गारठा होतात

मक्याची कणसं, कांद्याच्या भज्या होतात
कधी सागरी किनार्याच्या बेभान लाटा होतात

चिंब भिजून भावना साऱ्या देहाशी परततात
कोमेजलेल्या मनाला मग नवे सूर गवसतात

दरवर्षी पावसाळ्यात अशेच अनेक कविराज उमलतात
आणि आसपासच्या दुष्काळावर बारीकसा आघात करतात


- अभय आनंद साळवी

Saturday 4 May 2013

आमच्यातलाच ‘हा’

(या कवितेतला ‘हा’ म्हणजे कुठल्याही धर्मपरायण, श्रद्धावान, सात्विक इत्यादी माणसाच्या खोल आत दडपून ठेवलेला एक बंडखोर नास्तिक )

ह्या नास्तीकाची मिजास लय भारी
धर्मापेक्षा ह्याला ह्याची तत्व न्यारी

भाकडकथा म्हणतो सगळ्या
म्हणे सिद्ध करून देता का सह्या

आला मोठा निर्भीड स्पष्टवक्ता 
म्हणे दगडाच्या कश्यास पाया पडता

धार्मिक कार्याला म्हणतो धंदा
आणि आमच्या गुरुदेवांना म्हणतो भामटा

पण आम्ही बुवा भलतेच अध्यात्मिक
VIP लाईनीतूनच होतो सात्विक

वर्गण्या देतो हजारोंच्या
जश्या फिया भरतो पोरांच्या

सोयर सुतकांचे आम्ही पाळकरी
आता त्यांच्या मागून घातल्या शिव्या जरी

संकटात दोष देतो आम्ही देवाला
शेवटी केलेल्या Investment चा Interest नको का मिळायला

- अभय आनंद साळवी

Friday 26 April 2013

तो, ती आणि उन्हाळा...


तो म्हणतो ....

आज फुलला चंद्रमा हा
पाहुनी चंद्रास माझ्या
सौख्यं त्यास वाटले कि
आता लाभेल त्यास विसावा

भुलल्या साऱ्या कळ्या हि
जेव्हा दरवळला सुवास तुझा
बरसेल बघ आज गर्जून
उन्हाळ्यात तो ढग खुळा

निरखुनि मज आज पाहू दे
निसर्गाची हि कला
ये जरा जवळी असा
लाजऱ्या माझ्या फुला

ती म्हणते...

ऐन उन्हाळ्यात तुजला
हा कुठला नाद गवसला
छळू नकोस मज आज सख्या
बघ चुलीवरचा भात लागला

(ओतीन रंगात रंग
मेल्या पावसाळ्यात तुझ्या)..मनात
चिंब भिजली घामाने हि
तुलसीदासा तुझी प्रिया

(वास नुसता वास येतो
मेल्या दारूचा तुझ्या)..मनात
रागवू नकोस सख्या
फक्त २ महिन्यांचा दुरावा

तो म्हणतो....(मनातच)

(कर्म माझं चंद्र म्हटलो
माझ्या ह्या धुसक्या म्हशीला)
(फुल कसली हि तर
Flower Potच सारा)

(जोश्या साल्या म्हटला होतास
कवितांनी भाळतात ह्या)
(आता २ महिने वाट पाहू 
भावखाऊ पावसाची त्या)

-अभय आनंद साळवी